लेखक होणे नाही सोपे रे साधन
मनात शब्दांचे नुसते उठते वावधन
बसता एकांती विचारांचा येतो पूर
होऊन सावध घेतो ओंझळ भरून
चलचित्र फिरावे जैसे दिसे शब्दगंगा
मग अमृताची गोडी येत असे अभंगा
इतिहास आठऊनी दाखवी वर्तमानी
पिढ्यान् पिढ्यांचा स्रोत उतरवितो मनोमनी
दावितासे ब्रम्हज्ञान करुनी उत्तुंग लिखान
वाल्याचा झाला वाल्मिकी लिहून रामायण
कधी करणार नाही तो 'स्व' हिताचे लेखन
समाजाचा होतो आरसा जगवितो स्वाभिमान
लेखका जैसा धनी नाही तिन्ही जगात
करुनी लेखणीस माध्यम रक्षी दिनरात
अन्याय सहन करुनी वैकुंठ आणले भूवरी
वय वर्ष अवघे सोळा लिहूनी संत ज्ञानेश्वरी
काय वर्णावे लेखकाचे कसे असते आत्मचरित्र
कोऱ्या कागदावर सत्त्याचे सामर्थ्य दावी अहोरात्र
लेखका कैसी आण बाण शान
लिखान हेचि त्याचे जीव की प्राण
जगी या सर्वात भावनिक असतो तोचि
जानूनी घेतले भूतलावर सर्वांनी हेचि
सोनुताई रामलाल रसाळ,
कापूसवाडगाव, ता. वैजापूर