मार्केट होते फळ भाज्यांचे
सामराज्य होते तेथे गोंगाटाचे
विक्रेत्यांनी दुपारी घेतले जेवन
काही वेळातच गेले ते झोपून
फळभाज्या नी ठरवले घ्यावी सभा
आंबा राजा होता मधोमध उभा
प्रस्तावना केली बटाटे महाराजांनी
म्हणाले खाती सारे वेफर आनंदानी
मग उठले लाल गाजर डुलवा
खवा घालून सारे खाती गाजर हलवा
आंब्याचा तोरा लय भारी
सारे खाती आमरस पुरी
काकडी टोमॅटोची दोस्ती न्यारी
काकडी टोमॅटोची कोशिंबीर मस्तभारी
भाजी वांगी बटाट्याची रंगत न्यारी
लग्नाच्या पंगतीत मारती भरारी
बाजारात गर्दी ची वेळ झाली
आभार प्रदर्शनाने सभा संपली
श्री. सुभाष शांताराम जैन. ठाणे.
कवी, पत्रकार, लेखक छायाचित्रकार
'कस्तुरीराम,' साईनाथ सोसायटी,
वर्तक नगर, ठाणे ६.
subhashsjain@yahoo.com
मोबाईल नंबर . 9821821885
Whatsapp 8779348256