मन माझे गेले खंगून
आघात तुझे गेले सांगून
वाचता मम हृदय मी
झाले दुःखाने हैराण मी
नको नको वाटते मज काही
नैराश्य दाटले अंतरी असे काही
मन माझे कशातच रमेना रे आता
आरोपाविना नाही तुझ्या कसल्याच बाता
काय काय स्वप्ने मी रंगवली
तव वर्तूनुकिने ती भंगली
असा माझा जीव रंगला
तू माझा ना समजून संपला
नाते होते अंतरीचे
होते सतत कटकटीचे
नको वाटते मज आता ते नाते
आधार दिला नाही तू मजला
संकटात कधी ना तू धावला
मला कधी ना तू जीव लावला
असे कसे निष्ठूर वागणे तुझे
असे तुसडे रिपुही ना माझे
असा काय केला होता मी गुन्हा
येवू नको माझ्या आयुष्यात तू पुन्हा
खूप सुखात ठेवशील
मला तू जपशील
हा माझा भ्रम जाहला
माझे मन उभे मज खायला
आयुष्याची आणि गुणांची
झाली माझ्या मतीच माती
अशी नको वाटत आहेत मज नाती
घरात राहीले नाही प्रेम पूर्ण नाती
जे हवे होते मज बंधन ते आज नको आहे
अशी बिकट परिस्थिती तू माझी केली आहे
सौ. जयश्री अर्जुन मुंडे,
जि.प. उच्च प्राथमिक शाळा,
गावंदरा, ता. धारूर, जि. बीड