शोधत होते एक सहारा
तिथे मिळाला समुद्र किनारा,
काय सांगू तिचा कणवळा
नाव तिचे मैत्रीचा जिव्हाळा.
आठवण येताच तुझी
हसू लागते गाली,
तुझ्या माझ्या मैत्रीला
नजर लागू नये कुणाची
मैत्रीला ना रंग नसतो,
मैत्रीला ना गंध असतो ,
मैत्रीला नेहमी सोबत
राहण्याचा वेडा छंद असतो.
तू सोबत असताना
परकेपणा नाही जानवलाच कधी,
बोलण्यात तुझ्या परकेपणा
मला कधी भासलाच नाही.
ज्या ठिकाणी आपली
अनमोल मैत्री जन्मली
पुन्हा त्याच ठिकाणी
आपली भेट झाली
काय झाली अशी जादू
दुसरी मैत्रीण नाहीच झाली,
का आवडतेस तूच मला
मलाच का कळत नाही.
स्वाती नानासाहेब जाधव,लासूरगाव